समाजसुधारक | Maharashtratil Samajsudharak in Marathi | Samaj sudharak yanchi Mahiti
महात्मा जोतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. महात्मा ज्योतीबा फुले हे माळी समाजाचे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. आणि आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते. महात्मा ज्योतीबा फुले हे विचारवंत, समाज सुधारक आणि मराठी लेखक होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे आडनाव गोऱ्हे होते. फुलांचा व्यवसाय करत असल्याने त्यानंतर त्यांचे आडनाव फुले असे झाले. महात्मा ज्योतीराव फुले यांचे वडील फुलाचे व्यवसाय करत होते. ते व्यवसाय ते पुणे येथे करत होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू केली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले समाजाचा विरोध पत्करून ते या शाळेत शिकत होते.
बाल हत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात सुरू केले. पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली ती शाळा बुधवार पेठेत होती. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ३ जुलै १८५१ बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरु केली. Samajsudharak
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९६४ पहिला पुनर्विवाह पुण्यामधील गोखले यांच्या बागेत झाले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ स्त्रोत शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्यात होते. त्या काळामध्ये स्त्रियांना दुय्यम लेखत होते त्यामुळे ते पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा ते कायम प्रयत्न करत असेत. महात्मा ज्योतिबा फुले हे नऊ महिन्याचे असताना त्यांची आई मृत्यू पावली.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचे वय बारा होते त्यावेळी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी लावण्यात आला.
विष्णुशास्त्री पंडित-
विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म १८२७ साली सातारा येथे झाला. शास्त्री पंडित यांनी १८४८ साधी त्यांनी सरकारी शिक्षणखात्यात काम करण्यास सुरू केले. तेथे ते सर्व प्रकारचे काम करत असेत. विष्णुशास्त्री पंडित यांचे स्त्रियांच्या मदतीसाठी त्यांची कायम तळमळ होत असत. विष्णुशास्त्री पंडित यांनी एका विधवा महिलेशी लग्न केले. व ते लग्न झाल्यावर ते सर्व लोकांना कर्ते सुधारक असल्याचे दाखवून दिले. मूळशास्त्री पंडित यांचे गाव सातारा जिल्ह्यातील बावधन हे आहे.
Samajsudharak विष्णुशास्त्री पंडित स्त्रियांच्या सुधारणांना परंपरेचा आधार देत असत. विष्णुशास्त्री पंडित यांनी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली होती. १८६४ साली विष्णुशास्त्री पंडित यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर विष्णुशास्त्री पंडित हे मुंबईच्या इंदुप्रकाश इथे सामाजिक सुधारणा वादी या वृत्तपत्राचे ते संपादक झाले. विष्णुशास्त्री पंडित यांनी बाल विवाह प्रथेविरोधी आवाज उठवला.
गणेश वासुदेव जोशी
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी सातारा येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी असे आहे. गणेश वासुदेव जोशी हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि समाज सुधारक कार्यकर्ता होते. गणेश वासुदेव जोशी यांनी केलेल्या सार्वजानिक कार्यामुळे त्यांना सार्वजनिक काका असे म्हणत होते.
गणेश वासुदेव जोशी यांनी औंध संस्थान चे श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली १८७० साली पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना केली. या सभेमध्ये ते सरळ मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे हे त्यांचे काम होते. गणेश वासुदेव जोशी यांनी देशी व्यापार मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये ते साबण मेणबत्ती यासारख्या अनेक स्वदेशी वस्तू निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत असत. त्यांनी तयार केलेले स्वदेशी माल मुंबई पुणे नागपूर सातारा सुरत यासारख्या अनेक शहरांमधील दुकानात सामान पोहोचण्यासाठी ते प्रोत्साहन देत असत.
बाबा पदमनजी
बाबा पद्मनजी यांचा जन्म बेळगाव येथे १९३१ साली झाला. बाबा पद्मनजी यांचे मूळ आडनाव मुळे असे होते. बाबा पद्मनजी हे मराठी ग्रंथकार आणि ख्रिस्ती वाड:मय याचे जनक म्हणून ओळखले जात होते. बाबा पद्मनजी हे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार १८५४ साली केला. बाबा पद्मनजी यांचे शिक्षण पहिला सरकारी शाळेत झाला. त्यानंतरचे त्यांचे शिक्षक मिशन शाळेत झाले.
बाबा पद्मनजी यांनी १८४९ साली मुंबई येथे जाऊन चौपटी जवळील फ्री चर्च हायस्कूल मध्ये ते प्रवेश घेतले. बाबा पद्मनजी यांना शाळेत असताना त्यावेळेस त्यांना वाचनाची आवड लागली. बाबा पद्मनजी यांनी फ्री चर्च मिशन पाळक म्हणून सात एप्रिल १८६७ रोजी दीक्षा विधी स्वीकारले. बाबा पद्मनजी यांनी पाच ते सहा वर्षे पाळक म्हणून काम केल्यानंतर त्यांची सगळी वेळ ते लेखनामध्ये घालवत असत. बाबा पद्मनजी यांचे निधन मुंबई येथे झाले.
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामधील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले या समाज सुधारक होत्या.सावित्रीबाई फुले यांनी बाल हत्या रोखण्यासाठी समाजाचा विचार न करता आपले काम ते करत होते. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील प्रथम शिक्षिका होत्या आणि त्या सर्व मुलींसाठी ही शिक्षणाचे दरवाजे कायमचे उघडण्यासाठी प्रयत्न करत होते. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला.सावित्रीबाई फुले ह्या नऊ वर्षाच्या आणि ज्योतिराव फुले हे बारा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह १८४० साली झाला. सावित्रीबाई फुले यांना शिकण्याची खूप आवड होती. पण त्या शिकू शकल्या नाहीत. त्यामुळे लग्नानंतर ज्योतिराव फुले हे सावित्रीबाई फुले यांना शिकवू लागले.
सावित्रीबाई फुले या पुणे येथे मुलींची शाळा इ.स.१८४८ मध्ये सुरू केली. त्यावेळी या शाळेत शिकण्यासाठी फक्त नऊ मुली येत होत्या. त्यावेळी सावित्रीबाई फुले या त्या शाळेच्या प्राध्यापिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचे प्रवास शाळेपासून ते घरापर्यंत करणे खूप अवघड होते. सावित्रीबाई घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या विरोधात असलेले सगळी लोक त्यांच्यावर दगडफेक करत होते. सावित्रीबाई फुले या हळूहळू पुण्यामध्ये मुलींसाठी १८ शाळा स्थापन केल्या. सावित्रीबाई फुले या बाल हत्या रोखण्यासाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ मध्ये स्थापन केल्या.
पंडिता रमाबाई
पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला. पंडिता रमाबाई या पंधरा सोळा वर्षाच्या कालखंडात त्यांच्या आई-वडिलांकडून संस्कृत व्याकरण साहित्यिक यासारखे अनेक शिक्षण त्यांना मिळाले. पंडिता रमाबाई यांच्या आई वडील दुष्काळाच्या काळात १८७७ साली त्यांचे निधन झाले. पंडिता रमाबाई या मराठी गुजराती बंगाली कन्नड यासारख्या अनेक भाषा त्यांना येत होत्या. पंडिता रमाबाई यांचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांच्याबरोबर प्रवास करत ते कोलकत्ता पर्यंत पोहोचले. पंडिता रमाबाई यांना संस्कृत मध्ये यश मिळाले होते. पंडिता रमाबाई यांना बंगालच्या स्त्रियांकडून भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण हे त्यांना मानाचे प्रमाणपत्र मिळाले. पंडिता रमाबाई यांचे वैवाहिक जीवनात त्यांच्या पतीची साथ फार काळ लाभले नाही. पंडिता रमाबाई यांच्या पतीचे निधन अल्पशा आजाराने झाला. पंडिता रमाबाई यांना एकुलती एक मुलगी होती. पंडिता रमाबाई यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या त्यांच्या मुलगीला घेऊन पुणे येथे राहू लागले.
आणखी वाचा …
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक Samajsudharak in Marathi
भारतातील दळणवळण सुविधा आणि संचार
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती – प्रमुख 12 जिल्हे ।khanij Sampatti
sir, you should upload more information about Mahatma fule, vishnusatri pandit , pandit ramabai.
We want more information for the study. you didn,t mention his news paper lite that.
Yes, we will try to improve the article. Thanks for your valuable reply. Share the link and Support us.
All information was good sir but o want more details could you do for us because we need more information for study 🙏