भारतातील राज्य व राजधानी State and Their Capital
महत्वाचे मुद्दे
भारतामध्ये विविध राज्य अंतर्भूत आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने एकच विस्तृत भारत देश चालवणे कठीण आहे. या कारणाने भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. ऐतिहासिक कालखंडामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये प्रांत निर्माण केले होते. नंतर काळाच्या ओघात या प्रांतांमध्ये बदल होत राज्यांची निर्मिती झाली. सद्यस्थितीला भारतामध्ये ज्या पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत तशा पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश 1947 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा अस्तित्वात नव्हते.
State and Their Capital – सद्यस्थितीला भारतामध्ये दोन प्रकारचे प्रदेश पाहावयास मिळतात.
- १) राज्य
- २) केंद्रशासित प्रदेश
याठिकाणी आपण भारतामध्ये असणाऱ्या विविध घटक राज्यांची नावे, राजधानी आणि त्यांची स्थापना कधी झाली याविषयी माहिती घेणार आहोत.
भारतात एकूण किती राज्य आहेत?
भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 28 घटक राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. State and Their Capital सोबत या घटक राज्यांची निर्मिती कधी झाली याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे.
क्रमांक | राज्य | राजधानी | स्थापना |
१ | आंध्र प्रदेश | अमरावती | १ ऑक्टो. १९५३ |
२ | आसाम | गुवाहाटी | १ नोव्हें. १९५६ |
३ | बिहार | पाटणा | १ नोव्हें. १९५६ |
४ | कर्नाटक | बेंगलोर | १ नोव्हें. १९५६ |
५ | केरळ | तिरुवनंतपूरम | १ नोव्हें. १९५६ |
६ | मध्य प्रदेश | भोपाळ | १ नोव्हें. १९५६ |
७ | ओडिशा | भुवनेश्वर | १ नोव्हें. १९५६ |
८ | राजस्थान | जयपूर | १ नोव्हें. १९५६ |
९ | तमिळनाडू | चेन्नई | १ नोव्हें. १९५६ |
१० | उत्तर प्रदेश | लखनऊ | १ नोव्हें. १९५६ |
११ | पश्चिम बंगाल | कोलकाता | १ नोव्हें. १९५६ |
१२ | महाराष्ट्र | मुंबई | १ मे १९६० |
१३ | गुजरात | गांधीनगर | १ मे १९६० |
१४ | नागालँड | कोहिमा | १ डिसेंबर १९६३ |
१५ | पंजाब | चंदिगढ | १ नोव्हें. १९६६ |
१६ | हरियाणा | चंदिगढ | १ नोव्हें. १९६६ |
१७ | हिमाचल प्रदेश | शिमला | २५ जाने. १९७१ |
१८ | मेघालय | शिलॉंग | २१ जाने. १९७२ |
१९ | मणिपूर | इंफाळ | २१ जाने. १९७२ |
२० | त्रिपुरा | आगरतला | २१ जाने. १९७२ |
२१ | सिक्किम | गंगटोक | २६ एप्रिल १९७५ |
२२ | अरुणाचल प्रदेश | इटानगर | २० फेब्रु. १९८७ |
२३ | मिझोराम | ऐजवाल | २० फेब्रु. १९८७ |
२४ | गोवा | पणजी | ३० मे १९८७ |
२५ | छत्तीसगड | रायपूर | १ नोव्हें. २००० |
२६ | उत्तरांचल | डेहराडून | ९ नोव्हें. २००० |
२७ | झारखंड | रांची | १५ नोव्हें. २००० |
२८ | तेलंगणा | हैद्राबाद | २ जून २०१४ |
अगदी अलीकडील काळामध्ये म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणून भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली. तर दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण करण्यात आले.
सध्या स्थितीला देशात २८ घटक राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.
आणखी वाचा.
केंद्रशासित प्रदेश | Union Territory in India now 2021
NEET Exam Information in Marathi | Neet Exam 2021
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ midc act 1961 in marathi
Good
Good answer
Very useful information.
छान माहिती मिळाली आहे .
तेलंगणाची राजधानी हैद्राबाद आहे.
Fantastic
No
आंध्र प्रदेशाच्या 3 राजधान्या कोणत्या
Very useful information 👍👍