महाराष्ट्रातील 36 जिल्हे | महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती | Maharashtratil Jilhe latest 2024

महाराष्ट्रातील जिल्हे । Maharashtratil Jilhe

Maharashtratil Jilhe: महाराष्ट्रातील जिल्हे पाहण्याआधी प्रथमतः महाराष्ट्र कसा अस्तित्वात आला हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या निर्मितीवर अवलंबून आहे.  महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. परकीय अंमलाखाली असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले.  तरी महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 मध्ये झाली. 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे अस्तित्वात  होते.  काळाच्या ओघात सध्या म्हणजे आज पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. यापुढील काळामध्ये जिल्ह्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते.  ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग,  पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.  

सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत. 

यामध्ये नाशिक प्रशासकीय विभाग व अमरावती प्रशासकीय विभाग यांची भर पडली आहे. 

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे । Maharshtratil Ekun Jilhe 2024

Maharashtratil Jilhe: सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत.  महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी असलेल्या 26  जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे.  वाढती लोकसंख्या, प्रशासनाची सोय, लोकांची मागणी यासारख्या विविध मुद्द्यांना अनुसरून अशा जिल्ह्यांची निर्मिती केली जात असते. 

Maharashtratil Jilhe

Maharashtratil 36 Jilhe । महाराष्ट्रातील 36 जिल्हे

क्र. जिल्हा क्र. जिल्हा
मुंबई शहर १९ जालना
मुंबई उपनगर २० बीड
ठाणे २१ परभणी
पालघर २२ हिंगोली
रायगड २३ उस्मानाबाद
रत्नागिरी २४ लातूर
सिंधुदुर्ग २५ नांदेड
नाशिक २६ अमरावती
अहमदनगर २७ बुलढाणा
१० धुळे २८ अकोला
११ नंदुरबार २९ वाशीम 
१२ जळगाव ३० यवतमाळ
१३ पुणे ३१ नागपूर
१४ सातारा ३२ वर्धा
१५ सांगली ३३ भंडारा
१६ कोल्हापूर ३४ गोंदिया
१७ सोलापूर ३५ चंद्रपूर
१८ औरंगाबाद ३६ गडचिरोली
Maharashtratil ekun Jilhe

महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे | Maharashtratil Jilhe

क्र.  जिल्हा क्र.  जिल्हा
ठाणे १४ उस्मानाबाद 
कुलाबा १५ परभणी
रत्नागिरी १६ नांदेड
बृह न्मुंबई १७ बुलढाणा
नाशिक १८ अहमदनगर
धुळे १९ अकोला 
पुणे २० अमरावती 
सांगली २१ नागपूर
सातारा २२ वर्धा
१० कोल्हापूर २३ यवतमाळ
११ सोलापूर  २४ जळगाव
१२ औरंगाबाद २५ भंडारा
१३ बीड २६ चांदा 
महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे

पुढील तक्ता मधील दोन जिल्हे Maharashtratil Jilhe ठळक रंगात दिसतील. ठळक केलेले जिल्हे सध्या अस्तित्वात नाहीत. या जिल्ह्यांच्या नावांमध्ये  बदल करण्यात आलेले आहेत.

 कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून ‘रायगड’ असे करण्यात आलेले आहे तर चांदा जिल्ह्याचे नाव बदलून ‘चंद्रपूर’ असे करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये झालेला बदल | Maharashtratil 36 Jilhe

महाराष्ट्रातील सुरुवातीच्या 26 जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे.  हे दहा जिल्हे कोणत्या नवीन भूमीला महाराष्ट्र राज्यामध्ये सामावून घेत नाहीत.  अस्तित्वात असलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये फोड होऊन नवीन दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत.  हे पुढील प्रमाणे…. 

क्रमांक पूर्वीचा जिल्हा नवीन जिल्हा निर्माण झालेली तारीख
रत्नागिरी सिंधुदुर्ग १ मे १९८१
औरंगाबाद जालना १ मे १९८१
उस्मानाबाद लातूर १६ ऑगस्ट १९८२
चंद्रपूर गडचिरोली २६ ऑगस्ट १९८२
बृह न्मुंबई मुंबई उपनगर १ ऑक्टोबर १९९०
अकोला वाशिम १ जुलै १९९८
धुळे नंदुरबार १ जुलै १९९८
परभणी हिंगोली १ मे १९९९
भंडारा गोंदिया १ मे १९९९
१० ठाणे पालघर १ ऑगस्ट २०१४
महाराष्ट्रातील नवीन जिल्हे

महाराष्ट्र मधील एकूण सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे हे सात जिल्हे आहेत.

Maharashtra – भारतातील एक प्रगत राज्य।स्थान, क्षेत्रफळ,स्थापना कधी झाली

UPSC information in Marathi । upsc 2024 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे.

महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे.

महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?

महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?

सध्या महाराष्ट्र मध्ये एकूण 36 जिल्हे आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे होते?

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते.

कुलाबा म्हणजे कोणता जिल्हा?

कुलाबा जिल्हा मनाचे सध्याचा रायगड जिल्हा.

महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे?

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “महाराष्ट्रातील 36 जिल्हे | महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती | Maharashtratil Jilhe latest 2024”

Leave a Comment